जेव्हा मराठे काशीत पूल बांधतात...
श्री काशी श्रेत्राबद्दल प्रत्येक हिंदूंच्या मनात प्रचंड आदरभाव आजही टिकून आहे. तिथे काही पुण्यकर्म केले तर मोक्षप्राप्ती होईल असा समज मध्ययुगातही रूढ होता.
नाना फडणीसांच्या काळात काशीजवळ कर्मनाशी नदीवर पूल बांधण्याची कल्पना मनात आली. नानांनी आपले कारकून भास्करपंत कुंटे यांना पुलाचे काम सुरु करण्याबद्दल लिहले. पुलाचा पाया खोदण्यास प्रारंभ झाला. परंतु नदीमध्ये वाळूचा भराव आणि पाण्याचा जोर फार होता. पायाभरणीचे काम काही पुरे होईना, त्यामुळे पूर्वीच्या समजुतीप्रमाणे मांत्रिक बोलवून अनुष्ठाने केली.
ही गोष्ट नाना फडवीसांना कळली तेव्हा ते म्हणाले ,पुलाचे कामास मांत्रिकी अनुष्ठानाचा काहीही उपयोग होणार नाही. अनुष्ठाने बंद करवली आणि 'बेकर' नावाच्या एका युरोपीय कारागिरास २०००० रुपये देऊन पुलाचे काम सोपवले. पुलाच्या पायातील पाणी काढावयास दोन बंब तयार केले. परंतु ते तिथे लागू झाले नाहीत. तेव्हा त्याने कलकत्त्यावरून कळीचे बंब मागवून काम पूर्ण केले.
आजकालच्या जमान्यात काम Outsource करून पूर्ण करणे ही संकल्पना रूढ होत आहे, परंतु मध्ययुगातही हा प्रकार अनेकदा दिसून येतो.
संदर्भ : इतिहाससंग्रह : द. बा. पारसनीस
- रोहित पवार
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment