शपथक्रिया - महादजी आणि नाना


एखाद्या कार्यात दुसऱ्याच्या सोबतीने पुढे जाताना महत्वाचा असतो तो 'विश्वास' . दुसऱ्याच्या मनात काही काळंबेरं असेल तर त्याचा फटका दोघांनाही बसणार,अशा वेळी एकमेकांवरचा विश्वास दृढ व्हावा यासाठी तुळशीपत्र - बेलबंढारा देऊन 'बंधुत्वाची शपथ' घेतली जाई.





महादजी शिंदे आणि नाना फडणवीस , दोघेही मराठ्यांच्या इतिहासातील अतिशय महत्वाच्या व्यक्ती. महादजी उत्तरेत रण गाजवत तर नाना फडवणीस पुण्यात फडावर व्यवस्थापनाचं काम करत. त्यामुळे काही वाद -विवाद होणे स्वाभाविक होते.पण दोघांमध्ये काही वितुष्ट येऊन मराठा साम्राज्याचे नुकसान होऊ नये याची खबरदारी त्यांनी घेतलेली दिसते

१५ मार्च १७७९ रोजीच्या पत्रातला हा उल्लेख पहा, महादजी लिहतात :  

सरदारी माझी - फडनवीशी त्याची (नानाची), बंधुत्वाप्रमाणे वर्तन करू, ज्यात सरदारीचे कल्याण ते संधान चालवू, जो अनिष्ट चिंतील त्याचे पारिपत्य करू. आम्ही बेलबंढारा पाठवला आहे. आपण बंधुत्वाविषयी संशय न मानावा. आपण आहा तेथे मी आहे.

संदर्भ : ऐतिहासिक पत्रबोध - सरदेसाई, लेखांक ५४

- रोहित पवार
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा