शपथक्रिया - महादजी आणि नाना
एखाद्या कार्यात दुसऱ्याच्या सोबतीने पुढे जाताना महत्वाचा असतो तो 'विश्वास' . दुसऱ्याच्या मनात काही काळंबेरं असेल तर त्याचा फटका दोघांनाही बसणार,अशा वेळी एकमेकांवरचा विश्वास दृढ व्हावा यासाठी तुळशीपत्र - बेलबंढारा देऊन 'बंधुत्वाची शपथ' घेतली जाई.
महादजी शिंदे आणि नाना फडणवीस , दोघेही मराठ्यांच्या इतिहासातील अतिशय महत्वाच्या व्यक्ती. महादजी उत्तरेत रण गाजवत तर नाना फडवणीस पुण्यात फडावर व्यवस्थापनाचं काम करत. त्यामुळे काही वाद -विवाद होणे स्वाभाविक होते.पण दोघांमध्ये काही वितुष्ट येऊन मराठा साम्राज्याचे नुकसान होऊ नये याची खबरदारी त्यांनी घेतलेली दिसते
१५ मार्च १७७९ रोजीच्या पत्रातला हा उल्लेख पहा, महादजी लिहतात :
सरदारी माझी - फडनवीशी त्याची (नानाची), बंधुत्वाप्रमाणे वर्तन करू, ज्यात सरदारीचे कल्याण ते संधान चालवू, जो अनिष्ट चिंतील त्याचे पारिपत्य करू. आम्ही बेलबंढारा पाठवला आहे. आपण बंधुत्वाविषयी संशय न मानावा. आपण आहा तेथे मी आहे.
संदर्भ : ऐतिहासिक पत्रबोध - सरदेसाई, लेखांक ५४
- रोहित पवार
Shivbharat
Mahadaji
,
mahadaji shinde
,
Maratha Sardar
,
Nana phadnvis
,
Peshwa
,
Peshwai
,
Pune
No comments
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment