Maratha Empire लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Maratha Empire लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मराठा स्वराज्याचे सरखेल, आरमार प्रमुख 'कान्होजी आंग्रे' यांनी परकीय सत्तांना शह देत समुद्रावर सत्ता गाजवली.  काही वर्षांपूर्वी मराठ्यांच्या लहान बोटींना नावं ठेवणारे इंग्रज पुढच्या काळात मराठ्यांसारखी जहाजे आपल्याकडे  असायला हवीत असं म्हणायला लागले. यातच मराठ्यांच्या आरमाराचे यश दिसून येते. 





या कान्होजी आंग्र्यांवर   इंग्रज गव्हर्नर फिप्सने चाचेगिरीचा (pirates) आरोप केला, यावर कान्होजी आंग्रे यांनी अगदी समर्पक असे प्रत्युतर दिले ते वाचण्यासारखे आहे . 


" दुसऱ्याच्या मालकीची वस्तु आपल्या अधीन करुन घेण्याच्या बाबतीत म्हणायचे तर, असल्या महत्वकांक्षा आपणासारख्या व्यापार्यांनी बाळगल्या नाहित का? जगाचा शिरस्ताच आहे, परमेश्वर स्वतःचे असे काहिच देत नसतो. तो एकाचे काढून दूसर्याला देतो. परमेश्वराची ही कृती चांगली कि वाईट हे कोण ठरवनार ? एक विविक्षित राजसत्ता ही हिंसा, अपमान आणि चाचेगिरी (piracy) याच्यावर चालली आहे असे म्हणणे तुमच्यासारख्या व्यापार्यांना आजिबात शोभत नाही. व चार पातशाह्यांशी झुंज देऊन  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले तेव्हा याच गोष्टीचा त्यांनी अवलंब केला. आम्ही त्याच पद्धतीने सत्तेवर आहोत. खरेखोटे मानो अथवा न मानो  त्यामुळेच आम्ही टिकून आहोत." 


संदर्भ : दर्याराज कान्होजी आंग्रे - सदाशिव शिवदे

मुळ संदर्भ :  Consultation Bombay Castle 7th august 1724


- रोहित पवार 

आंग्र्यांचे इंग्रजाना उत्तर



इंग्रज हिंदुस्थानात व्यापारासाठी आले. पुढे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली पण कंपनीची अरेरावी खटकु लागल्याने इंग्लड मधील व्यापार्यांनी 'न्यू इंग्लिश कंपनी' सुरु केली. याचबरोबर जुन्या ईस्ट इंडिया कंपनी बंद करण्यात यावी यासाठी ३ वर्षाची मुदत देखील देण्यात आली. आता  या नव्या कंपनिला हिंदुस्थानात मोगल बादशाह कडून पूर्वीच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्व  सवलती मिळाव्यात म्हणुन इंग्लडच्या राजाने वकील म्हणुन 'सर विलियम नॉरिसला' बादशाह औरंगजेबाकडे हिंदुस्थानात पाठवले. पुढे दोन्ही कंपन्या एकत्र झाल्याने नॉरिसची वकीली वाया गेली, पण भेटी दरम्यान त्याने दैनंदिनी टिपुन ठेवली.
२५ जानेवारी १७०१ रोजी नॉरिस सुरतेहुन औरंगबादकडे निघाला. २२ फेब १७०१ रोजी शहागड (औरंगबाद) गावी आला. याठिकानी सुरतेच्या एका सुप्रसिद्ध व्यापार्याची वखार होती तिथे मराठयांनी धमाकुळ घातला होता. "मोठेमोठे मोगल अधिकारी प्रवास करण्यास घाबरत, इतका त्यांना मराठयांचा धाक वाटत" ,असे त्याने नमुद केले आहे.
मराठयांचे सातारा,पन्हाळगड इत्यादि किल्ले जिंकन्यासाठी औरंगजेबाने ब्रम्हपुरीहुन मिरज मार्गे पन्हाळगडाकडे प्रस्थान केले होते. औरंगजेबच्या प्रवासाची ही माहिति जमा करुन त्याच्या मागाहुन नॉरिस २७ मार्च १७०१ रोजी मिरजेस पोहोचला. बादशाह औरंगज़ेब नुकताच इथे राहुन गेला होता. त्याच्या छावणीची जागा नॉरिसने पाहिली. छावणीभोवतीचा संरक्षण 'खंदक' पाहुन नॉरिसला हसु आले. तो म्हणतो, 'हा कसला खंदक ! सहा-सात वर्षाचे मुलसुद्धा हा खंदक सहज ओलंडु शकेल.
संदर्भ : Norris Embassy to Aurangjeb - Haridaas

मराठ्यांची धास्ती आणि औरंगजेबचा खंदक !