पुण्यातला गणेशोत्सव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुण्यातला गणेशोत्सव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

 अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत 'श्रीगणेश' आणि त्याचा परंपरेनुसार होणारा उत्सव हा खरंतर साजरा करण्यासोबतच तो अभ्यासाचाही विषय आहे. नानासाहेब खासगीवाले, भाऊसाहेब रंगारी, दगडुशेठ हलवाई या मान्यवरांच्या पुढाकारातुन आणि लोकमान्य टिळकांच्या पुरस्कारातून पुण्यातुन या उत्सवाला १८९३ साली सुरवात झाली.






आजच्या काळात गणेश मंडळांमधे आकर्षण असते ते प्रकाश व्यवस्था आणि हलत्या देखाव्यांबद्दल. परंतु त्याकाळात 'व्याख्यान' हा आकर्षणाचा विषय असे. स्वातंत्र्य चळवळीत लोकांचा सहभाग आणि जनजागृती हा त्यामागे मुळ हेतु होता. यात टिळक, त्यांचे सहकारी तसेच काही मुस्लिम व्याख्यातेही ठिकठिकाणी सहभाग घेत असत.

याकाळातही अनंत चतुर्दशीला मोठया उत्साहात मिरवणुक निघत असे. १८९४ च्या मिरवणुकीचा तपशिल केसरी वृत्तपत्रात सापडतो. मंडळांची संख्या वाढल्याने मिरवणुकीत मान कसा असेल याचा निर्णय टिळक आणि आन्नासाहेब पटवर्धन यांनी घेतला. आघाड़ीवर ग्रामदैवत कसबा, दूसरा तांबडी जोगेश्वरी त्यामागे क्रमांकाप्रमाणे आणि शेवटून तिसरा भाऊसाहेब रंगारी , शेवटून दूसरा दगडूशेठ हलवाई आणि शेवटी मंडईकरांचा अशी भव्य रांग लागत असे. रस्ते दुतर्फा लोक़ांनी फूललेले असत.

मिरवणुक सुरळीत पार पडावी यासाठी काशीनाथ जाधव , कृष्णशास्त्री कवडे यांच्यावर जबाबदारी होती . पुढे हे व्यवस्थापन करण्यासाठी १९०८ साली 'गणेश मंडळाची' स्थापना करण्यात आली.

इतिहास संशोधक आणि मोड़ी जाणकार मंदार लवाटे यांच्या 'पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव १२१ वर्षाचा' या पुस्तकात गणेशोत्सव मिरवणुकींचा १८९३ पासुन २०१३ पर्यंतचा सर्व प्रवास दिला आहे. वरील सर्व तपशील ससंदर्भ दिले गेले आहेत. त्यासोबतच अनेक दुर्मीळ छायाचित्रांचा देखिल समावेश करण्यात आला असून वाचनीय पुस्तक म्हणुन दखल घेतली पाहिजे.

संदर्भ : पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव १२१ वर्षाचा - मंदार लवाटे
चित्र १ : भाऊसाहेब रंगारी मंडळ मिरवणुक वर्ष १९११
चित्र २ : मुखपृष्ठ - पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव १२१ वर्षाचा

गणपती मिरवणुकीचा इतिहास